सतत असते एक
अनामिक ओझे
कधी चलते बरोबर
तर कधी येते मागे
तय गाठोद्यात असतात
अनेक चिंता, अनेक आठवणी
भाराने कधीही जात नाहि
पण डोळ्यातील पाणी
मान वाकून आता
ओझ्याची सवय च जाली
पण ते हलके करण्याची
धमक अंगी नाही
असेलही कदाचित!
पण धीर केला नही
डोला पाणी कधी
पुसलेच नाही...
चालत राहिले तशीच
उगाचच ओझे वाहत
पाय खेचत , काठ लोळत
चालत राहिले...अनाहत.

No comments:
Post a Comment